Posts

Showing posts with the label Agro

किसान विकास पत्र (KVP) खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेशी संपर्क साधू शकता.

Image
       किसान विकास पत्र (KVP) ही भारत सरकारने ऑफर केलेली बचत योजना आहे. हे प्रथम 1988 मध्ये सादर करण्यात आले आणि नंतर 2014 मध्ये पुन्हा सादर केले गेले. ही एक प्रमाणपत्र योजना आहे ज्यामध्ये व्यक्ती निश्चित कालावधीसाठी त्यांचे पैसे गुंतवू शकतात आणि हमी परतावा मिळवू शकतात. KVP योजना प्रामुख्याने शेतकरी आणि ग्रामीण लोकांसाठी आहे ज्यांना औपचारिक बँकिंग सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र, या योजनेत कोणीही गुंतवणूक करू शकतो.      KVP ही एक बचत योजना आहे जी व्यक्तींना त्यांचे पैसे ठराविक कालावधीसाठी गुंतवू देते आणि त्यांच्या गुंतवणुकीवर हमी परतावा मिळवू देते. KVP मधील गुंतवणूक एका निश्चित कालावधीत दुप्पट होते, जी सध्या 124 महिने (10 वर्षे आणि 4 महिने) आहे. KVP वरील व्याजदर सरकारने वेळोवेळी जाहीर केला आहे आणि तो सध्या वार्षिक 6.9% आहे (मार्च 2023 पर्यंत). KVP साठी किमान गुंतवणूक रक्कम रु. 1,000, आणि कमाल मर्यादा नाही. गुंतवणूक रु.च्या पटीत करता येते. 1,000. KVP प्रमाणपत्र भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून किंवा अधिकृत बँकांकडून खरेदी केले जाऊ शकते. KVP प्रमाणपत्र हे एक...

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतरगत 50 हजार प्रोत्साहन अनुदान संदर्भातील नवीन जी आर आला

Image
राज्यातील २०१९ मध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या; पण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. तीनपैकी दोन वर्षे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजारांचे अनुदान दिले जाईल.                                      एखादा शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसालासुद्धा या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांमधील बंधने दूर करीत नवीन सरकारने हा निर्णय घेतला. एकूण १४ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि सरकारच्या तिजोरीवर ६ हजार कोटी रुपयांचा भार पडेल. नैसर्गिक आपत्तीत मदत मिळालेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्याचा समावेश यापूर्वीच्या निर्णयात करण्यात आलेला नव्हता. आता तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल. कशी होणार अंमलबजावणी?  – नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्...

पीएम किसान योजनेच्या खात्यात नाही जमा झाली रक्कम ? शेतकऱ्यांनी येथे करावी तक्रार !

Image
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला. पण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला त्याविरोधात तक्रार दाखल करता येते.देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM Kisan चे पैसे जमा झालेले आहेत, परंतु जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नसतील; तर तुम्हाला खाली दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल, तरच तुम्हाला PM Kisan योजनेचे पैसे मिळणार आहेत. PM KISAN योजनेचा 13 वा हप्ता येऊन 3 आठवडे पूर्ण झाले आहेत, 22 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 हजार कोटी एवढी रक्कम सरकार द्वारे जमा करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळालेला नाही. 13 वा हप्ता जमा करण्यापूर्वी सरकारद्वारे शेतकऱ्यांची अपात्र यादी जाहीर करण्यात आली होती, त्या यादीनुसार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून वगळण्यात आलं होतं. पण अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अपूर्तते मुळे देखील PM Kisan योजनेचा 13 हप्ता मिळालेला नाही आहे.  पंतप्रधान किसान सम्मान निधी   (PM Kisan Samman Nidhi Yojana)...